Coronavirus Update India
भारतावरील कोरोना चे संकट पाहता १९ मार्च २०२० ला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली होती, आणि त्याच घोषणेचे संपूर्ण भारतातील जनतेने पालन करत लॉक डाऊनला यशस्वी रित्या पार पाडले. तरीही भारतातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात न आल्यामुळे केंद्र सरकाने जाहीर केले की प्रत्येक राज्य आपल्या येथील परिस्थिती पाहून लॉकडाऊनची मर्यादा वाढवू शकते. या सुचनेवर निर्णय घेताना महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊनला ३० एप्रिल पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉक डाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात मिळतील ह्या सुविधा – These Facilities Available in Second Phase of Lockdown
परंतु लॉक डाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात सरकारने काही सुविधा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून लॉक डाऊनच्या परिस्थिती मध्ये जनतेला काही गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून जनतेसाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत, त्यामध्ये कृषी,औषधी, आणि जीवनावश्यक वस्तू यांचा समावेश केला गेला आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे १५ पेक्षा जास्त रुग्ण असतील ते त्या जिल्ह्याला रेड म्हणून संबोधले जाते आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत त्या जिल्ह्याला ऑरेंज म्हणून संबोधित करण्यात आले आहे. काही राज्यांच्या रेड जिल्ह्यांमध्ये राज्यातील सुरक्षा संघटना राज्यातील जनतेला आवश्यक वस्तू घरापर्यंत पोहचवून देत आहेत.
सरकारने वाढीला लॉक डाऊन मध्ये कृषी उत्पादन, भाजीपाला, किराणा, तसेच औषधांच्या सुविधा वैद्यकिय सुविधा या गोष्टींना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉक डाऊनला वाढवल्याने सरकारवर आर्थिक संकट येऊ शकतं आणि सरकार यावर आपलं प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत आहे. आणि सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रत्येकाला हीच आशा आहे की भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल,अश्याच आणखी माहितीपर बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळून राहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!