Coronavirus Effect: India is lockdown for 21 Days
चीन मधून सुरुवात होऊन सर्व जगामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे,
या संकटाच्या काळात प्रत्येक राष्ट्राला आपल्या देशातील नागरिकांची काळजी होत आहे.
या सर्व गोष्टींना पाहता भारत सरकार ही आपले योग्य ते पाऊल उचलत आहे.
कोविड-१९ (COVID-19) ही एक गंभीर संसर्गजन्य बिमारी आहे, या सर्व गोष्टींना लक्षात घेता.
२४ मार्च च्या रात्री ८ वाजता संपूर्ण देशाला संबोधन करताना माननीय मोदींजींनी काही गोष्टी देशापुढे मांडल्या.
त्यामध्ये सुरुवातीला जनता कर्फ्युचे योग्यरित्या पालन केल्याने त्यांनी सर्व जनतेचे आभार व्यक्त केले,
आणि सोबतच बोलतांना त्यांनी सांगितले की हा आजार किती भयंकर आहे,
आणि जगामध्ये या आजाराने आपले पाय खूप गंभीररीत्या पसरवले आहेत.
कोरोनाचा कहर २१ दिवसांसाठी भारत राहणार बंद – Coronavirus Effect: India is lockdown for 21 Days
जनतेला संबोधन करताना त्यांनी जनतेकडे २१ दिवसांचा कालावधी मागितला, कारण कोरोना विषाणूची देशामध्ये साखळी निर्माण होऊ नये, व त्याचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होऊ नये,
त्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल सरकार ला उचलावे लागले.
दिवसाला एका व्यक्तीस या विषाणूची लागण झाल्यास तो व्यक्ती देशातील अंदाजे ६०,००० व्यक्तींसाठी हानिकारक आहे. इटली, अमेरिका या सारख्या प्रगतिशील देशांमध्ये सर्वात मोठी चूक त्यांनी केली ती म्हणजे लोकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखले नाही आज त्या देशांमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा हजारोपर्यंत पोहचला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात पाळलेल्या जनता कर्फ्युचे कौतुक करताना म्हटलं कि भारताकडे कोरोना ला हरविण्याची क्षमता आहे.
भारताने याआधीही चांगल्या प्रकारे संकटांवर मात केली आहे.
तर कोरोना च्या संक्रमनापासून वाचण्यासाठी जेवढे लोकांच्या कमी संपर्कात येणार तेवढे चांगले, स्वतःची काळजी घ्या, घरी राहून आपल्या परिवाराला तसेच देशाला सुरक्षित ठेवा.
सोबतच या बातमीला आपल्या प्रियजनांना शेयर करा आणि समाजात जागरूकता पसरविण्यासाठी आपले योगदान द्या! अश्याच ताज्या बातम्यांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!