Tuesday, August 26, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

या कारणांमुळे रामानंद सागर हे “उत्तर रामायण” बनवायला तयार झाले. 

Ramanand Sagar Uttar Ramayan

भारतात १९८८ च्या काळात आलेला एक टीव्ही शो ज्या टीव्ही शो ने आज भारतात एक वेगळा प्रेक्षक गट मिळवला आहे, आणि या लॉकडाऊन च्या काळात लोकांना घरात कंटाळा येऊ नये तसेच लोकांनी घरातच राहावे यासाठी प्रसारण मंत्रालयाने टीव्ही वर रामायण दाखवायला सुरुवात केली आहे, काही जुन्या व्यक्तींकडून असं ऐकायला येत की जेव्हा १९८८ च्या काळात रामायण मालिका टीव्ही वर दाखविल्या जात असे तेव्हा घरातील सर्व लोक एकत्र येऊन या मालिकेचा आनंद घेत असत.

हि मालीका चालू असताना कुठलीही व्यक्ती बाहेर दिसत नव्हती, आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रकारच्या परिस्थितीची आवश्यकता पाहता भारत सरकारच्या दूरसंचार आणि प्रसारण मंत्रालयाने लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत प्रेक्षकांच्या भेटीला रामायण मालिका पुन्हा दूरदर्शन वर घेऊन आले. आणि त्या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद सुध्दा लाभला, पण आपल्याला माहीत आहे का की रामायणात रावणाचा वध झाल्यानंतर रामानंद सागर यांनी रामायण मालिकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता, पण कुठल्या  कारणाने त्यांनी उत्तर रामायण लोकांना दाखविण्याचे ठरविले होते. हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया त्यामागे नेमकं कारण काय होत?

या कारणांमुळे रामानंद सागर हे “उत्तर रामायण” बनवायला तयार झाले – Why Ramanand Sagar did not want to create ‘Uttar Ramayan’

Ramanand Sagar Uttar Ramayan
Ramanand Sagar Uttar Ramayan

रामायण मालिकेत जेव्हा भगवान श्रीराम यांच्या हातून लंकापती रावणाचा वध होतो, तेव्हा भगवान श्रीराम आपल्या पत्नीला घेऊन अयोध्येला येतात, त्यानंतर भगवान श्रीराम यांचा राज्यभिषेक होतो आणि त्यानंतर रामायण मालिकेची समाप्ती होते. रामानंद सागर यांनी येथेच रामायणाची समाप्ती करण्याचे संकेत दिले होते त्यांचे म्हणणे होते की तुलसीदास रामायणात समोरील कथेचे वर्णन आपल्याला आढळून येत नाही म्हणून त्यांनी समोरील रामायण बनविण्यापासून माघार घेतली होती.

परंतु त्याकाळात रामायणाचा लोकांना एवढा लळा लागला होता की लोकांची मागणी समोरील रामायण पाहण्यासाठी वाढली होती, आणि प्रेक्षकांच्या या प्रतिसादाला न नाकारता रामानंद सागर यांनी उत्तर रामायणाची निर्मिती केली आणि रामायणाच्या समोरील घडलेल्या कथांना त्यांनी उत्तर रामायणातुन प्रेक्षकांना दाखविण्याचे प्रयत्न केला. आणि प्रेक्षाकांचा रामायणाला जेवढा प्रतिसाद आला होता तेवढाच प्रतिसाद उत्तर रामायणाला सुध्दा आलेला होता.

तर आपल्याला या लेखातून माहिती झाले असेल की प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे उत्तर रामायणाची निर्मिती करण्यात आली होती, आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved