सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ आजचा दिनविशेष: जाणून घ्या ७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष पंचांग दिनविशेष कॅलेंडर सुविचार
आज इतिहास माहिती आजचा इतिहास चरित्र व्हायरल सुविचार मंत्र किल्ले आरती करिअर सण-उत्सव शहरांची माहिती
माहिती

यामुळे भारताला India सुध्दा म्हटल्या जात! जाणून घ्या या लेखातून

इंडिया...! इंडिया...! क्रिकेटचे मैदान असो की आणखी कोणत्या खेळाचे जेव्हा भारतीय संघ मैदानावर खेळत असतो तेव्हा त्या मैदानावरील प्रेक्षक आपल्या देशाचा अश्या प्रकारे जोरजोरात आवाज करताना आपल्याला दिसतात. आणि असा…

Vaibhav Bharambe ·१८ मे २०२० ·अद्ययावत १७ मे २०२० ·वाचन वेळ २ मि.
Why Bharat is Called India
Why Bharat is Called India

Why India is Called Bharat

इंडिया…! इंडिया…! क्रिकेटचे मैदान असो की आणखी कोणत्या खेळाचे जेव्हा भारतीय संघ मैदानावर खेळत असतो तेव्हा त्या मैदानावरील प्रेक्षक आपल्या देशाचा अश्या प्रकारे जोरजोरात आवाज करताना आपल्याला दिसतात. आणि असा आवाज आपल्याला ऐकतच राहावासा वाटतो. सोबतच एखाद्या विदेशाच्या ठिकाणी गेलो तर तिथे आपल्या देशाला इंडिया म्हणून ओळखले जाते. आणि आपल्याला इंडियन. मग आपण कधी विचार केला का की आपल्या देशाचे नाव इंडिया कस पडलं! किंवा आपल्या देशाचे नाव इंडिया असण्यामागचे कारण काय असेल? नाही माहिती तर काळजी नका करू, आजच्या या छोट्याश्या लेखात आपण पाहणार आहोत की आपल्या देशाच नाव इंडिया कसे पडले. तर चला पाहूया…

म्हणून भारताला इंडिया म्हणतात – Why Bharat is Called India

Why Bharat is Called India
Why Bharat is Called India

 सर्वात आधी आपण प्राचीन काळापासून सुरुवात करू, प्राचीन काळात सुध्दा आपल्या देशाचे नाव होते. भारताचे प्राचीन काळचे नाव हे आर्यावर्त हे होते. तसेच भारताला सिंध प्रांत म्हणून सुध्दा ओळखल्या जायचे. त्यानंतर ज्या काळात इंग्रज भारतावर शासन करत होते तेव्हाच भारताला इंडिया या नावाने संबोधले गेले आणि भविष्यात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या राज्यघटना लिहिणाऱ्या व्यक्तींनी या नावाला इंग्रजांनी दिलेला वारसा म्हणून त्या नावाचा स्वीकार केला.

जेव्हा भारतामध्ये विदेशातून व्यापारी वर्ग, भारतावर आक्रमण करणारे विदेशी देश, काही विदेशी प्रवासी यांच्या मुळे त्यांच्या आपापल्या देशात भारताला सिंध म्हणून ओळख मिळाली. आणि भारताला सिंध प्रांत म्हणून विदेशात ओळख मिळाली. याप्रकारे भारताच्या नावाचा विदेशातही प्रचार झाला.

भारतात विदेशातून व्यापार करण्यासाठी व्यापारी येत होते, येथील वस्तुंना विकत घेऊन ते त्यांच्या देशात विकत होते. तेव्हाच्या काळात भारतीय वस्तूंना विदेशातून सुध्दा मागणी प्राप्त झाली होती. आणि सर्वदूर सिंध प्रांताचा प्रचार झाला होता. आणि भारताच्या नावाचा प्रचार सर्वात जास्त जर कोणत्या देशांच्या माध्यमातुन झाला तर तो युनानी आणि इराणी. इराणी किंवा जुन्या फारशी भाषेत सिंध चा अर्थ हिंदू समजल्या जायचा. आणि त्यामुळे आपल्या देशाचे नाव हिंदुस्तान पडले.

आणि युनानी मध्ये हिंदुस्तान च्या ए च्या उच्चाराला इंडोस म्हटल्या गेले होते. त्यानंतर ए हा शब्द लॅटिन भाषेत जाऊन पोहचला आणि आपल्या देशाचे नाव इंडिया पडले. आणि तेव्हा पासून आपल्या देशाला इंडिया म्हटल्या जाऊ लागले. आणि मग विदेशातही भारताला इंडिया म्हणून ओळख मिळाली.

आजच्या लेखात आपण पाहिले भारताचे नाव इंडिया का पडले. तर आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

तुमची प्रतिक्रिया

तुमचा ईमेल प्रकाशित केला जाणार नाही.