Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

आपल्याला तहान का लागते? जाणून घ्या या लेखातून

Panyache Mahatva in Marathi

आपल्याला माहिती आहे की पाणी हेच आपले जीवन आहे, पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा विना पाण्याचा राहूच शकत नाही, तो जर विना पाण्याचा राहिला तर काही दिवसात त्याची मृत्यू होईल म्हणूनच पाण्याला आपण जीवन संबोधतो. सुरुवातीला पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा संपूर्ण पृथ्वी ही पाण्याने व्यापलेली होती. आणि प्रत्येक जीवाची सुरुवात ही पाण्यातूनच झाली म्हणून सुध्दा पाणी एक प्रकारे आपले जीवनच आहे.

आपण ही ऐकत असाल की एका दिवसातून एवढं पाणी पिणे महत्वाचं आहे. आणि शरीराला दिवसातून पाण्याची एवढी मात्रा मिळणे आवश्यकच आहे. पण बरेच जणांना एक प्रश्न असतो की आपल्याला तहान का लागत असेल बर ? यामागे नेमकं कारण काय असेल बरं तर आजच्या या लेखातून आपण पाहणार आहोत की माणसाला तहान का लागते? तर चला पाहूया..

 शरीराला पाण्याची आवश्यकता का भासते – Why is water Important to Humans?

Why is water Important to Humans
Why is water Important to Humans

आपल्याला तहान का लागते? – Why we Feel Thirsty

मनुष्याचे शरीर ज्या पेशींपासून बनलेला आहे त्या पेशींमध्ये ७५% – ८०% पाणी भरलेलं असते, जेव्हा या पेशींमध्ये पाण्याची कमतरता भासते तेव्हा आपल्याला तहान लागते आणि आपल्याला तहान लागल्यावर पाणी पितो, आपण जे पाणी पितो त्या पाण्याने शरीरातील पाण्याची कमी भरून निघते. आणि आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित रित्या चालू राहते.

शरीरात पाण्याची कमतरता का भासते? – Why does body feel Dehydrated

ज्या प्रमाणे एखाद्या यंत्राला सतत कार्य केल्यामुळे त्यामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता भासते. त्याला नेहमी नेहमी दुरुस्त करून किंवा त्यामध्ये ऑइल टाकून त्याला चालविल्या जाते. त्याचप्रमाणे आपले शरीर सुध्दा एखाद्या यंत्राप्रमाणे कार्य करत असते.

एका दिवसाला मानवी शरीरातून जवळजवळ ३ लिटर पाणी बाहेर पडते. आपल्या शरीरातील अर्धा लिटर पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर पडते. १ लिटर स्वासाच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि दीड लिटर पाणी आपल्या मूत्राच्या स्वरूपात बाहेर पडते. असे मिळून एकत्रित रित्या ३ लिटर पाणी एका दिवसाला मानवी शरीर बाहेर टाकते.

त्यामुळेच जर आपण दिवसाला ३ लिटर पाणी पिले नाही तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते,म्हणून दररोज किमान ३-४ लिटर पाणी आपण पिले पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरातील सर्व क्रिया ह्या सुरळीत रित्या चालू राहतील.

माणूस पाण्याविना किती दिवस जिवंत राहू शकतो? – How many days can a person live without water

अन्नाशिवाय माणूस जवळ जवळ ४५ दिवस जिवंत राहू शकतो, झोपेशिवाय मनुष्य जवळ जवळ १० दिवस जिवंत राहू शकतो, परंतु पाण्याशिवाय मनुष्य ५-६ दिवसांपेक्षा जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही.

कारण पाणी माणसाच्या शरीरातील खूप महत्वाचे फॅक्टर आहे, पाणी नाही तर माणसाचे जीवन नाही, या निमित्ताने च एक चांगला संदेश ही दिला जाईल की पाण्याविना मनुष्य जीवन काहीही नाही म्हणून पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करा जेणेकरून आपल्याला भविष्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.

तर आपण वरील छोट्याश्या लेखात आपण पाहिले की आपल्याला तहान का लागते आणि आपल्या शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे, आशा करतो आपल्याला वरील लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा छोटासा लेख आवडला अस्वल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved