• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

रमाबाई (रमाई) आंबेडकर यांचे जीवन चरित्र

Ramabai Ambedkar Mahiti

Ramabai Ambedkar Information in Marathi 

रमाबाई (रमाई) आंबेडकर यांचे जीवन चरित्र – Ramabai Ambedkar Information in Marathi

नाव (Name)रमाई (रमाबाई), रमा (बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाणे ‘रामू’ म्हणत)
जन्म (Birthday)७ फेब्रुवारी  १८९८
जन्मस्थान (Birthplace)वंणदगाव
मृत्यू (Death)२७ मे, १९३५ (वय ३५) राजगृह, दादर, मुंबई
वडिल (Father Name)भिकू धुत्रे (वलंगकर)
आई (Mother Name)रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती (Husband Name)डॉ. बाबासाहेब आंबेडकर  
अपत्ये (Childrens Name)यशवंत आंबेडकर

रमाबाई यांचे सुरवाती जीवन – Ramabai Ambedkar Biography in Marathi

रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्या सह त्या आपल्या दाभोळजवळील वंणदगावात राहत होत्या.

त्यांचे वडिल भिकू धोत्रे हे दाभोळ  बंदरातील माश्यांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचविण्याचे काम करीत असतं.

त्यांचे कुटुंब एक मोठ कुटुंब होतं. त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबतच त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते.

रमाबाई लहान असतांना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले. त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले.

आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता.

कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी आली होती. यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले.

रमाबाईंचा विवाह – Ramabai Ambedkar Marriage

रमाबाई आपल्या भावंडान सोबत मुंबईत आपल्या काका व मामा सोबत राहत होत्या. त्या काळी बालविवाह प्रथा समाजात रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह त्यांच्या लहानपणीच करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होते.

त्यांना भायखळ येथे लग्नाची मुलगी आहे असे समजले. त्यांनी वलंगकर यांना लग्नाची मागणी केली. रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये ई.स. १९०६ साली झाले.

लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय १४ वर्षाचे तर, रमाबाई ह्या केवळ ९ वर्षांच्या होत्या. रमाबाईंनी आपल्या जीवनात खूप दु:ख सहन केलं आहे.

रमाबाईंचा जीवन संघर्ष – Ramabai Ambedkar History

रमाबाई यांचे लग्न त्याकाळीन बाल विवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब ई.स. १९२३ साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले.

यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावं लागलं.

त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.

बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण, त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या.

रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप मरण पहिली व  ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या. कारण, लहान पणीच आई व त्यानंतर वडिल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या ७ वर्षानंतर वडीलांसमान सासरे रामजी सुभेदार यांचा ई. स. १९१३ साली मृत्यू झाला.

बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात मग्न असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांना या बद्दल काहीच कल्पना दिली नाही.

त्याचप्रमाणे ऑगस्ट १९१७ साली झालेला बाबांच्या सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू, पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू अश्या प्रकारचे प्रसंग त्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या अनुपस्थित उद्भवले होते.

ई.स.१९२१ साली रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठ दुखद घटना घडली ती म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर, व ई.स.१९२६ मध्ये राजरत्न यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला.

इतक सर्व त्यांच्या सोबत घडत असतांना देखील त्यांनी या बद्दल बाबासाहेबांना काहीच सांगितल नाही. घरातील एकेक जणांचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या.

आपला उधर्निर्वाह करण्या करता त्या शेन गवऱ्या तसचं सरपणासाठी वनवन फिरल्या.

अश्याप्रकारे रमाबाई आंबेडकर यांनी  कुणालाही चाहूल न होऊ देता,

आपला व आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासठी त्या पहाटे सूर्योदयापूर्वी आणि रात्री आठ वाजल्यानंतर गोवऱ्या थापायला वरळीत जात असतं.

रमाबाई यांचे निर्वाण – Ramabai Ambedkar Death

रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगल होतं.

जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरिर पोखरून गेलं होतं.

त्यांना आजार बळावला होता. ई.स. १९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला

आणि मे १९३५ साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते.

त्यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती.

बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असतं.

असेच काही दिवस सुरु असतांना २७ मे १९३५ साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली.

खरच, यातून अस म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान खूप मोठ आहे.

बाबासाहेब यांच्या बॅरिस्टर बनण्यामागे रमाबाई यांचे भरपूर मोठ सहकार्य आहे.

बाबासाहेबाणा अभ्यासात कुठल्याच प्रकारची अडचण अथवा त्रास होऊ नये या करिता त्यांनी आपल्या परिस्थिती बद्दल काहीच सांगितलं नाही.

अश्या या थोर रमाबाई यांच्या बद्दल सांगाव तितकं कमीच मी या लेखातून आपल्याला त्यांच्या बाबत थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी अशेच ऐतिहासिक लेख वाचा.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ रमाबाई आंबेडकर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…

धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक

V.S. Khandekar Mahiti मराठी कथा, कादंबरीकार म्हणून सर्वांनाच परिचित असणारं नाव वि.स. खांडेकर. भारतात साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असा समजला जाणारा...

by Editorial team
May 19, 2022
Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved