Friday, May 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला! जाणून घ्या या लेखातून.

Ramayana Short Story

आजपासून हजारो वर्षांपूर्वी इतिहासात घडलेल्या घटनांचे व्यवस्तीत रित्या संग्रह केलेला आपल्याला आजही आढळून येतो. वाल्मिकी रामायणाचे त्या काळातील संतांनी आप आपल्या भाषेत अनुवादन केलेले आढळते. रामायणात भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून तर निर्गमनापर्यंत सर्व माहिती दिली गेली आहे. आपल्याला रामायणात पाहायला मिळते की सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ यांना तीन पत्नींपासून चार पुत्ररत्न प्राप्त होतात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि समोरील रामायण आपल्याला माहितीच आहे.

पण आजच्या लेखात आपण रामायणातील काही विशेष घटनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जसे दशानन रावणाचा वध हा प्रभू श्रीराम यांच्या हातूनच का झाला? यामागे काही तरी कारण असेल का ? तर चला आजच्या लेखात आपण त्यामागचं कारण पाहूया की रावणाची मृत्यु ही प्रभू श्रीराम यांच्या हातूनच का झाली ?

प्रभू श्रीरामांच्या हातून रावणाचा वध का झाला – Ramayana Story in Marathi

ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा प्रभू श्रीराम यांचा जन्मही झालेला नव्हता, आणि रावणाने पूर्ण धर्तीवर आपले साम्राज्य पसरविण्यासाठी अनेक राजांवर आक्रमण करत बरेचसे राज्य काबीज केले होते, रावणाला त्याच्या शक्तींचा गर्व झालेला होता, युद्ध करत करत तो सूर्यवंशी कुळात आला त्याकाळचे सूर्यवंशी राजा अनरण्य होते.

त्यांनी रावणाशी युध्द केले आणि रावणाशी ते त्या युध्दामध्ये पराजित झाले आणि ते स्वतःच्या प्राणाला मुकले परंतु मरणाच्या आधी त्यांनी रावणाला श्राप दिला, की आज माझा वध तुझ्या हातून झाला परंतु भविष्यात तुझ्याही वध माझ्याच कुळातील व्यक्ती करेल. असा श्राप त्यांनी रावणाला देऊन ते मरण पावले.

त्यांनंतर रघुवंशात विष्णूचा अवतार मानले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, त्यांनी गुरुकुलात शिक्षा प्राप्त केली, आपल्या तरुणवयातच अनेक राक्षसांचा वध केला, सितास्वयंवरा मध्ये आपले चातुर्य आणि बल दाखवून त्यांनी शिवधनुष्य मोडला, माता सीतेशी विवाह केला, आणि त्यानंतर अयोध्येला आले काही दिवसांनंतर माता कैकयीच्या दासी मंथरेने कैकयी मातेच्या मनात पुत्रमोहाचे विष घातले आणि प्रभू श्रीरामांना १४ वर्ष वनवास आणि भरताला सिंहासन मागत राजा दशरथ यांच्याकडे आपले राहिलेले दोन वर मागितले, त्यांनंतर प्रभू श्रीरामांनी पित्याच्या शब्दांचे पालन करत वनवास स्विकारला आणि १४ वर्षांसाठी वनवासात निघून गेले. त्यांनंतर नियतीचे चक्र फिरत गेले आणि रावणाला कुबुद्धि सुचली आणि माता सीतेचे  त्याने अपहरण करून लंकेला घेऊन गेला.

Ramayana Story in Marathi
Ramayana Story in Marathi

त्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघांनी मिळून सीता मातेला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तेव्हा त्यांना ते शक्य झाले नाही, मग प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना वानर सेनेचा पाठिंबा मिळाला आणि सीता मातेचा शोध सुरू झाला, आणि तो शोध पूर्णत्वास आणला पवनपुत्र हनुमान यांनी मग नल, निल जमुवंत अंगत यांच्या मदतीने लंकेला जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आणि त्यानंतर युध्दाला सुरुवात झाली बरेच पराक्रमी योध्दा त्या युध्दामध्ये मारल्या गेले, आणि शेवटी वेळ आली होती ती  स्वतः लंकापती रावण आणि प्रभू श्रीराम यांच्यात युद्ध करण्याची आणि हे युध्द करतांना रावणाचा सुध्दा बाकी  राक्षसांप्रमाणेकच वध झाला. तर रघुवंशाच्या त्या राजाच्या श्रापामुळे दशानन रावणाचा अश्या प्रकारे प्रभू श्रीराम याच्या हातून वध झाला.

तर आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved