Monday, June 30, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जमशेदजी टाटा यांचे जीवन चरित्र

जमशेदजी नुसीरवानजी टाटा / Jamshedji Tata भारताचे पहिले उद्योगपति होते ज्यांनी भारत ची सर्वात मोठी मिश्र कंपनी टाटा ग्रुपचि स्थापना केली होती. त्यांचा जन्म गुजरातच्या नवसारी नामक छोटया कस्ब्यामध्ये पारसी पादरिच्या परिवारात झाला होता.

आणि नंतर त्यांनीच टाटा ग्रुप ऑफ कंपनी ची स्थापना केली. टाटांना भारतात “भारतीय उद्योगाचे जनक” म्हटले जाते.

Jamshedji Tata Biography

जमशेदजी टाटा यांचे जीवन चरित्र – Jamshedji Tata Biography in Marathi

त्यांचा जन्म जमशेदजी नुसीरवानजी टाटा च्या नावाने 3 मार्च 1839 झाला होता. जमशेदजी टाटा नुसीरवानजी टाटा यांचे पुत्र होते.

पारसी परिवार चे ते एकमात्र उद्योगपति होते जे पारसी परिवाराच्या पादरी समुदायामध्ये आपली पत्नी जीवनबाई टाटा च्या सोबत राहत होते.

नंतर नुसीरवानजी टाटा उद्योग मध्ये आपली आवड पाहता त्यांनी आपल्या परिवारासोबत उद्योग करण्यासाठी मुंबईला गेले.

मुंबई मध्ये त्यांनी एक छोटया व्यापारापासून सुरवात केली परंतु कधी त्यांनी छोटा व्यापार करताना पराभव स्वीकारला नाही.

जमशेदजी टाटानी एलफिंस्टन कॉलेज, मुंबई वरून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले, जेथे ते आपल्या कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांची बुद्धिमत्ता पाहून प्रिंसिपल ने डिग्री समाप्त होईपर्यंत जमशेदजीची पूर्ण फी परत करण्याचा निर्णय घेतला.

जमशेदजी टाटा नी 14 वर्षाच्या अल्पायु मध्येच व्यापार करणे सुरू केला, त्यावेळी ते व्यापारासोबतच शिक्षण सुद्धा घेत होते. त्यावेळी बाल विवाहाची प्रथा खूप प्रचलित होती. त्याचा विचार ठेवूनच भविष्याचे महान उद्योगपति जमशेदजीनी 16 वर्षाच्या वयात 10 वर्षाची हीराबाई दबू सोबत विवाह केला.. 1858 मध्ये ते कॉलेजातून ग्रेजुएट झाले आणि आपल्या वडिलांच्या व्यापारी संस्थेमध्ये सह्भागी झाले.

व्यक्तिगत जीवन

1857 चा ब्रिटिश सरकार च्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. तर टाटानी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेवून जाण्याचा निश्चय केला.

त्यांचा मुलगा दोराबजी टाटा आणि रतनजी टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले.

टाटाची बहिण जेराबाई, ने मुम्बईच्याच एका व्यापारयासोबत विवाह केला आणि शापुरजी सक्लटवाला यांची आई झाल्या. शापुरजी सफलता पुर्वक बिहार आणि ओड़ीसा मध्ये टाटा ग्रुप चे कोळसा आणि लोखंड व्यापार सांभाळत होते. नंतर शापुरजी टाटाचे मेनचेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे साम्यवादी सदस्य निवडल्या गेले.

एक उद्योगपति सारखी ओळख जरी 14 वर्ष्याच्या वयात जमशेदजी टाटांनी आपला व्यवसाय सुरु केला होता परंतु ते आपले पुर्ण योगदान 1858 मध्ये ग्रेजुएशन झाल्यानंतरच देवू शकले.

1858 पासून ते आपल्या वडिलांच्या प्रत्येक कामात सहभागी होत असत, त्यांनी त्यावेळी आपल्या व्यवसायाला शिखरावर घेवून जाण्याचा निश्चय केला. 1857 च्या उठावामुळे भारतात उद्योग विश्व जास्त विकसित नव्हते.

1857 चा मुख्य उद्देश् भारतामध्ये ब्रिटिश राज्यास समाप्त करणे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच होता. तरी सुद्धा 1859 मध्ये नुसीरवानजीनी आपल्या मुलास हॉंग कॉंग च्या यात्रेवर पाठविले, जेणेकरून आपल्या मुलाची उद्योग क्षेत्रात आवड वाढवू शकतील. आणि त्यांच्या वडिलांच्या इच्छेस जमशेदजीनी चांगल्या प्रकारे पूर्ण केले.

आणि पुढच्या चार वर्षा पर्यंत जमशेदजी हॉंग कॉंग मध्येच राहिले , आणि ते आपल्या वडिलांची इच्छा तिथे टाटा ग्रुप ऑफ़ कंपनी चे कार्यालय सुरु कराण्याचा विचार करू लागले.

हॉंग कॉंग मध्ये टाटा कंपनी च्या ऑफिस ची स्थापना टाटा साम्राज्याचा विस्ताराला घेवून एशिया मध्ये टाटा & सन्स द्वारा घेतल्या गेलेले पहिले पाउल होते. आणि 1863 पासून टाटा कार्यालय फक्त हॉंग कॉंग मध्येच नाही तर जापान आणि चीनमध्येही स्थापन केल्या गेले. आशिया मध्ये आपल्या उद्योगमध्ये विशाल यश मिळविल्यानंतर जमशेदजी टाटा युरोप च्या यात्रेवर निघून गेले . परंतु तिथे त्यांना सुरवातीलाच असफलतेचा सामना करावा लागला.

About Jamsetji Tata

आशिया प्रमाणे युरोपमध्ये ते सुरवातीस ते यशस्वी होऊ शकले नाही. यासाठी जमशेदजीनी इंग्लंडला जाऊन आपल्या वडिलांच्या नातेवाईकांशी संबंध वाढविण्याचा निश्चय केला, जेणेकरून लंडनमध्ये भारतीय बँक स्थापन करू शकतील.

परंतु टाटाचा हा निर्णय त्यांच्यासाठी खूप चुकीचा ठरला, कारण कि भारतीय बँकिंग सेक्टर साठी हि योग्य वेळ नव्हती. आणि ज्या वेळी टाटानी हा निर्णय घेतला होता त्या वेळी भारत आर्थिक दुर्बलतेतून जात होता.

याचा सरळ परिणाम टाटाच्या व्यवसायावर पडला, आणि टाटा ग्रुपला मोठ्या अयशस्वीतेचा सामना करावा लागला. त्या वेळी फक्त भारतातच नाही तर पूर्ण आशिया मध्ये टाटा ग्रुप कंपनीला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.

या सर्वांच्या मागे विदेशात भारतीय बँकला स्थापन करण्यामध्ये अयशस्वी होणे हेच होते.

नंतर 29 वर्षाच्या वयापर्यंत जमशेदजीने आपल्या वडिलांचीच सोबत केली.

आणि आपल्या वडिलांच्या सोबत काम करू लागले, नंतर त्यांनी स्वतःच एक व्यापारी कंपनी सुरु केली. हि 1868 ची गोष्ट आहे, जमशेदजीनी स्वतःच खूप कॉटन मीलांची स्थापना केली. टाटांच्या मिलांचे हे साम्राज्य 1874 मध्ये नागपुर मध्ये स्थापित केल्या गेले जिथे जमशेदजी टाटांनी खूप पैसे मिळविले. क्वीन विक्टोरिया जेव्हा भारताची महारानी झाली होती यालाच लक्ष्यात ठेवून त्यांनी आपल्या मिलचे नाव ठेवले होते.

नागपुर च्या त्या मिलांपासून टाटा ग्रुप ने खूप कमाई केलीन परंतु तोच मिल नंतर जमशेदजीनी खूप मोठ्या किमतीवर विकला होता.

जमशेदजी टाटांच्या कॉटन मीलमध्ये उत्पादित झालेले कपडे फक्त भारतामध्येच उपयोग केल्या जात नाही तर त्यांना विदेशातहि निर्यात केल्या जाते.

ज्यामध्ये जापान, कोरिया, चीन आणि मध्य-पूर्व चे खूप देश समाविष्ट आहेत.

जमशेदजी टाटांच्या त्या कॉटन मीलचा मुख्य उद्देश् फक्त आणि फक्त लोकांना चांगली गुणवत्ता देवून त्यांना समाधानी करणे हाच होता.

ज्याचा फायदा पूर्ण टाटा उद्योगास मिळाला.

त्यांच्या मिलाला आधी धर्मसि कॉटन मील आणि नंतर स्वदेशी कॉटन मील म्हटल्या जात असे, ज्याचा लोकांच्या बुद्धीवर खूप प्रभाव पडला.

आणि लोक फक्त भारतीय वस्तुंचाच उपयोग करू लागले. आणि ब्रिटिश वस्तूंचा त्याग करू लागले.

Jamsetji Tata Information

तेव्हापासून आजपर्यंत जमशेदजीचा मुख्य उद्देश् देशी वस्तुना प्रोत्साहन देणे हाच होता.

या कारणामुळे आज टाटा सन्स भारताची सर्वात प्रसिद्ध कंपनी बनली आहे.

टाटा कंपनी आपल्या उत्पादनासोबतच सर्वात चांगले काम करण्याचे वातावरण देणाऱ्या कंपनीच्या रूपात ओळखल्या जात आहे. असे म्हटल्या जाते कि टाटा ग्रुप ऑफ़ कंपनी आपल्या कामगारांना चांगल्यात चांगली सेवा प्रदान करते.

ज्या वेळी लोकांना आरोग्य आणि चिकित्सा आणि वाहतूक सेवांच्या विषयी माहिती सुद्धा नव्हते त्यावेळी जमशेदजीने आपल्या कामगारांना या सुविधा दिल्या.

त्यांनी कामगारांनाच नाही तर त्यांच्या मुलानाही चांगल्या सेवा दिल्या, आणि एक्सीडेंट भरपाई, पेंशन यासारख्या सुविधा दिल्या.

ते आपल्या कामगारांना कामाचे प्रशिक्षणसुद्धा देत असत.

ते जमशेदजी टाटाच होते ज्यांनी जापानीज स्टीम नेविगेशन कंपनीला मालभाडे कमी करण्याची अपील केली होती.

कारण कि मालभाडयाचा सर्वात जास्त परिणाम जमशेदजींच्या कमाईवर होत होता.

त्यांच्या या अपीलचा फायदा फक्त टाटा ग्रुपलाच नाही तर पूर्ण देशाला झाला.

जमशेदजिने त्यांच्या विरुद्ध केस सुद्धा दाखल केली आणि आपले स्वतःच्या पैशाने केस को लढू लागले, आणि शेवटी त्यांना यश आले.

आणि कोर्टाने त्यांचे अपील मान्य करून मालभाडयामध्ये कमी केली. कोर्टाच्या या निर्णयामुळे भारतीय व्यापारयांनाको खूप नफा झाला..

शेवटी 19 मई 1904 ला जमशेदजी टाटांनी अंतिम श्वास घेतला. आणि आज ते पूर्ण भारतीय उद्योग जगताचे प्रेरणास्त्रोत आहेत.

आज टाटा ग्रुप ऑफ़ कंपनी भारताचीच नाही तर पूर्ण विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीच्या रुपात ओळखल्या जाते.

एक नजरेत जमशेदजी टाटांचा जीवन परिचय

  • 1839- 3 मार्च ला जमशेदजी टाटांचा जन्म झाला.
  • 1853- हीराबाई दबू सोबत लग्न झाले.
  • 1858- आपल्या वडिलांच्या व्यवसायमध्ये सहभागी झाले.
  • 1868- स्वतःची कंपनी स्थापण केली.
  • 1874- महारानी मीलची स्थापना केली.
  • 1901- यूरोप आणि अमेरिकेची यात्रा केली, जेणे करून स्टील चे शिक्षण घेता येईल.
  • 1903- ताज महल हॉटेलची स्थापना केली.
  • 1904- 19 मेला देहवास झाला.

हे योग्य आहे कि आम्ही त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा सम्मान करावा आणि एका आधुनिक भारताच्या निर्मात्याच्या रूपात त्यांना आठवूया.”

जवाहरलाल नेहरू जमशेदजी टाटा भारताचा सर्वात मोठा उद्योग समुह टाटा चे संस्थापक होते.

त्यांनी आपल्या कुशलतेने विशाल टाटा साम्राज्य देशांतच नाही तर विदेशातही स्थापन केले.

त्यांनी आपल्या कुशलतेच्या जोरावर र आज टाटा ग्रुप & कंपनीला शिखरावर पोहचविले आणि जगामध्ये एक नवीन ओळख दिली.

जमशेदजी टाटा भारताच्या प्रथम महान उद्योगपतीमधून एक मानल्या जातात. आज त्यांच्या योगदाणामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप & कंपनीची मुहूर्तमेढ रोवली , आणि त्यामध्ये यशस्वी झाले.

त्यांचे नेहमी असे मत होते कि कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटे-छोटे काम करण्याची आवश्यकता असते.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved