Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

महाराणी ताराबाई माहिती

Maharani Tarabai Marathi Mahiti

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी माणसाला दाखवले आणि ते स्वप्न खरेही केले. महाराजांच्या परिवारातील प्रत्येकजण लढला. ज्याप्रमाणे पुरुष लढले त्याच प्रमाणे स्त्रियांनीही स्वराज्य कायम राहण्यासाठी लढा दिलेला आपल्याला दिसतो. अशा लढवय्या स्त्रीपैकी एक होत्या राणी ताराबाई.

Contents show
1 महाराणी ताराबाई माहिती – Maharani Tarabai Information in Marathi
1.1 मुघल बादशहा औरंजेबाला स्वराज्यापासून दूर ठेवले – Maharani Tarabai and Aurangzeb
1.2 मराठ्यांचे नेतृत्व –
1.3 राणी ताराबाई- मृत्यू – Maharani Tarabai Death
1.4 महाराणी ताराबाईंविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Maharani Tarabai

महाराणी ताराबाई माहिती – Maharani Tarabai Information in Marathi

नावराणी ताराबाई
जन्म 14 एप्रिल 1675
वडिलांचे नाव सर सेनापती हंबीराव मोहिते
पतीचे नावराजाराम महाराज
मृत्यू4 डिसेंबर 1761

राणी ताराबाई यांचा जन्म 1675 साली मराठा सैन्यातील सर सेनापती हंबीराव मोहिते यांच्या घरी झाला. सर सेनापती हंबीराव मोहिते यांची त्या कन्या.

1684 मध्ये राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह होऊन त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई झाल्या.

राणी ताराबाई ह्या अतिशय हुशार आणि लढवय्या होत्या.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राणी ताराबाई यांनी मराठा राज्याची सूत्रे हाती घेतली.

ज्या वेळी मराठा साम्राज्याला चांगल्या नेतृत्वाची गरज होती, त्या वेळी ताराबाईंनी ते नेतृत्व आपल्या हाती घेतलं आणि मुघल सम्राट औरंगजेबाचा धैर्याने सामना केला.

1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब खूप आनंदी झाला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिणेत आपला तळ जमवून पश्चिम भारतावर साम्राज्य प्रस्थापित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असा विचार त्याने केला.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा संभाजी महाराज हे राजाच्या गादीवर बसले आणि त्यांनी विजापूरसह इतर मुघलांच्या तळांवर हल्ले केले.

१६८२ मध्ये औरंगजेबाने दक्षिणेत आपला तळ बनवला, जेणेकरून तेथे राहून तो सैन्यावर नियंत्रण ठेवू शकेल आणि संपूर्ण भारतावरील साम्राज्याचे स्वप्न साकार करू शकेल.

त्याने १६८६ आणि १६८७ मध्ये विजापूर आणि गोलकोंडा ताब्यात घेतले.

सैनिकांच्या मदतीने संभाजी महाराजांचा विश्वासघात करून औरंगजेबाने 1689 मध्ये संभाजी महाराजांना पकडले आणि 11 मार्च 1989 रोजी औरंगजेबाने त्यांना ठार मारले.

मुघल बादशहा औरंजेबाला स्वराज्यापासून दूर ठेवले – Maharani Tarabai and Aurangzeb

संभाजी महाराजांचा धाकटा मुलगा “शाहू” जो खूप लहान होता तो आता अधिकृतपणे मराठा साम्राज्याचा वारस होता. पण औरंगजेबाने या मुलाचे अपहरण केले आणि सौदा करण्यासाठी त्याला आपल्या कैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.

आता आपला विजय निश्चित आहे या विचाराने औरंगजेबाला खूप आनंद झाला कारण त्याने मराठा साम्राज्य आणि गादीवर बसणाऱ्या वारसांचा जवळजवळ नाश केला होता.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि त्यांच्या मुलाच्या अपहरणानंतर, संभाजींचा धाकटा भाऊ राजाराम म्हणजेच राणी ताराबाईंचे पती मराठा साम्राज्याचा वारस बनले. त्यांनी त्यांच्या काळात मुघलांशी अनेक युद्धे केली, परंतु राजाराम महाराज १७०० साली आजारापणात मरण पावले.

आता राज्याभिषेकाच्या नावाखाली मराठ्यांकडे फक्त विधवा आणि दोन लहान मुले उरली आणि मराठा साम्राज्याचा अंत अटळ आहे, असे समजून औरंगजेबाला पुन्हा आनंद झाला.

मात्र त्याचे मनसुबे यावेळीही पूर्ण होणार नाहीत याची त्याला कल्पनाही नव्हती. 25 वर्षांच्या राणी ताराबाईने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली आणि अवघ्या चार वर्षांचा मुलगा शिवाजी दुसरा याला राजा म्हणून घोषित केले.

मराठ्यांचे नेतृत्व – 

ताराबाईंनी साम-दाम-दंड-भेद या सर्व पद्धतींचा अवलंब करून मराठा सरदारांशी हातमिळवणी केली आणि  राज्यात आपली पकड मजबूत केली.

आणि राजाराम महाराजांची दुसरी राणी राजसबाई हिलाही तुरुंगात टाकले.

ताराबाईंनी पुढची काही वर्षे  बादशहा औरंगजेबाविरुद्ध आपले युद्ध चालू ठेवले.

ताराबाईंनी औरंगजेबाची युद्धनीती जाणून घेऊन, गनिमीकावा या मराठा युद्धनीती अवलंब करून विरोधी सैन्याची अनेक रहस्ये देखील जाणून घेतली.

हळूहळू ताराबाईंनी आपल्या सैन्याचा आणि जनतेचा विश्वास संपादन केला. त्याचवेळी मराठ्यांचा आपण नायनाट करू शकलो नाही हेच दु:ख छातीवर घेऊन औरंजेबाचा सन 1707 मध्ये वयाच्या 89व्या वर्षी मृत्यू झाला.

संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांनंतर मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला होता तो राणी ताराबाईंच्या नेतृत्वात.

त्यांनी सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली.

राणी ताराबाई- मृत्यू – Maharani Tarabai Death

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्याचा धक्का त्यांना सहन करता आला नाही आणि अखेरीस राणी ताराबाई यांचा 4 डिसेंबर 1761 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी मृत्यू झाला.

त्यांनी सतत सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला.

एका विधवा राणीने मुघलांशी केलेला हा संघर्ष म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील हि एक असामान्य घटना आहे.

एक स्त्री म्हणून राणी ताराबाईंनी केलेली कामगिरी इतिहास कधीच विसरू शकणार नाही.

राणी ताराबाईंविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जुळून रहा माझी मराठी सोबत.

महाराणी ताराबाईंविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Maharani Tarabai

प्रश्न. राणी ताराबाई यांचे वडिलांचे नाव काय होते?

उत्तर. सरसेनापती हंबीरराव मोहिते.

प्रश्न. राणी ताराबाईंचे पतीचे नाव काय होते?

उत्तर. राजाराम महाराज.

प्रश्न. राणी ताराबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोण होत्या?

उत्तर. सून.

प्रश्न. राणी ताराबाईंच्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर. शिवाजी द्वितीय.

प्रश्न. राणी ताराबाईंनी कोणासोबत लढा दिला?

उत्तर. मुघल बादशहा औरंगजेब

Previous Post

शेयर मार्केट म्हणजे काय?

Next Post

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

Guru Nanak Information in Marathi
Marathi History

गुरुनानक साहिब यांच्या विषयी माहिती

Guru Nanak पृथ्वीवर जगाचा उद्धार करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा जन्म होतच असतो. त्या महापुरुषांमध्ये एक नाव आहे शिखांचे पहिले...

by Editorial team
February 25, 2022
14 August History Information in Marathi
History

जाणून घ्या १४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 14 August Dinvishes मित्रांनो, आज आपल्या देशाच्या इतिहास काळात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे भारताची फाळणी ही होय. इंग्रज सरकारने...

by Editorial team
August 14, 2020
Next Post
गेटवे ऑफ इंडिया माहिती

गेटवे ऑफ इंडिया माहिती

नवीन शैक्षणिक धोरण 2020

नवीन शैक्षणिक धोरण 2020

बहिणाबाई चौधरी माहिती

बहिणाबाई चौधरी माहिती

वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक

वि.स. खांडेकर - मराठी साहित्यिक

पद्मदुर्ग किल्ला माहिती

पद्मदुर्ग किल्ला माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved