• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

स्वच्छता अभियानावर एक सुंदर निबंध

January 1, 2021
28 January History Information in Marathi

जाणून घ्या 28 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 28, 2021
Motivational quotes in Marathi for success

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

January 27, 2021
27 January History Information in Marathi

जाणून घ्या 27 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 27, 2021
Republic Day Shayari in Marathi

प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण

January 26, 2021
26 January History Information in Marathi

जाणून घ्या 26 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 26, 2021
Prajasattak Dinachya Shubhechha

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा संदेश

January 25, 2021
25 January History Information in Marathi

जाणून घ्या 25 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 25, 2021
Things to Do When You're Feeling Lonely

एकटेपणा जाणवत असेल तर नक्की करून पहाण्यासारख्या आहेत या 20  गोष्टी…

January 24, 2021
24 January History Information in Marathi

जाणून घ्या 24 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 24, 2021
Types of Number Plates

गाड्यांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? हे आहे त्यामागील कारण!

January 23, 2021
23 January History Information in Marathi

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 23, 2021
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Thursday, January 28, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

स्वच्छता अभियानावर एक सुंदर निबंध

Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

“स्वच्छता ज्याचे घरी, लक्ष्मी तेथे वास करी,” हे वाक्य तर आपण ऐकले असणारच, ज्याच्या घरी स्वच्छता असेल त्याच्या घरीच लक्ष्मीचा वास असतो. अशी आपल्याकडे मान्यता सुद्धा आहे, स्वच्छतेला आपल्या येथे सुरुवाती पासूनच जास्त महत्व दिल्या जात होते, पण काही काळानंतर लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगावे लागत आहे, तर आजच्या लेखात आपण स्वच्छतेविषयी निबंध पाहणार आहोत.

स्वच्छता अभियानावर एक सुंदर निबंध – Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi
Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

२ ऑक्टोबर २०१४ ला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेची सुरुवात केली, या मोहिमेची सुरुवात तर आता झाली, पण स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा गांधीजी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करायचे तेव्हा त्यांच्या सोबत गरीब, श्रीमंत, मोठमोठे नेते मंडळी, स्वयंसेवक, सर्वजण हातामध्ये झाडू घेऊन रस्त्यावर निघायचे. आणि सफाई करायचे.

जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या अभियानाची सुरुवात केली, तेव्हा देशात सगळीकडे “एक पाऊल स्वच्छतेकडे” पाहायला मिळालं. तसेच “क्लीन इंडिया ग्रीन इंडिया” यासारखी अनेक नवनवीन घोषवाक्यें सुद्धा पाहायला मिळाली. यापासून देशात बऱ्याच प्रमाणात बदल आला आहे, आणि ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहेच.

या मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयामध्ये या मोहिमेविषयी जास्त प्रमाणात जागरुकता पाहायला मिळाली, तसेच या मोहिमेचा उद्देश हाच आहे कि संपूर्ण देश स्वच्छ झाला पाहिजे. या मोहिमेची सुरुवात इसवी सन १९९१ ला झालेली होती पण तेव्हा या मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर मनमोहन सिंह यांनी सुद्धा १९९९ ला “निर्मल भारत” अभियानाची सुरुवात केली होती पण तेव्हा सुद्धा हि मोहीम जास्त प्रमाणात कारगीर ठरली नाही,

पण जेव्हा नरेंद्र मोदींनी या अभियानाला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण देशातून या मोहिमेला चांगला प्रतीसाद मिळाला.

स्वच्छता आवश्यक का आहे? – Importance of Cleanliness

आपल्याला बऱ्याच देशांमध्ये असलेली स्वच्छता माहिती आहे, आणि त्या देशांची प्रगती सुद्धा आपण पाहून आहोत, प्रत्येक देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात तेथील नागरिकांच्या मानसिकतेवर अवलंबून असतो जर प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभावना असेल तर तो देश एक दिवस नक्कीच विकसित होतो.

तर आपल्या देशात सुद्धा स्वच्छता अभियानाची सुरुवात करून लोकांना स्वच्छतेविषयी जागरूक केल्या गेलं, त्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्व समजले, एवढचं नाही तर स्वच्छता का आवश्यक आहे, हे सुद्धा लोकांना समजायला लागले, स्वच्छतेमुळे बरेचशे फायदे आहेत, जसे आपण आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली तर एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं, आणि कामात मन सुद्धा लागतं, रोगराई आपल्या पासून दहा हात दूर राहते, जर रोगराई चे प्रमाण कमी झाले तर आपल्याला इतर खर्चांच्या ओझ्याखाली दबण्यापासून वाचू शकतो.

स्वच्छता अभियानाने पडलेला प्रभाव – Swachh Bharat Abhiyan Result

जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती झाडू घेतला तेव्हा बरेच जणांना हि गोष्ट एक स्टंट सारखी वाटली पण त्या गोष्टीमुळे आज देशावर एक नवीन प्रभाव पडताना आपल्याला दिसत आहे, स्वच्छता अभियानासाठी भारत सरकार ने ६० हजार कोटींपेक्षा जास्त पैसा मंजूर केला आहे, सोबतच या अभियानासाठी भारत सरकारने स्पेशल अ‍ॅप आणि वेब साईट बनवली आहे, ज्यामध्ये याविषयी सर्व माहिती मिळते,

या योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला १२,००० रुपयांचे दिल्या जात आहे, त्यामध्ये केंद्र सरकार ९,००० रुपये देत आहे, आणि राज्य सरकार ३,००० रुपये. या अ‍ॅप च्या माहितीनुसार आतापर्यंत देशात लाखो कुटुंबांनी शौचालये बांधली आणि त्याचा वापर सुद्धा करत आहेत, अनेक जिल्ह्यांमधील गावे आता हागणदारीमुक्त झाली आहेत.

स्वच्छतेमध्ये आपलं योगदान कसे देऊ शकतो?

आपल्या दैनंदिन जीवनात आपण आजूबाजूला कश्या प्रकारे स्वच्छता ठेवू शकतो,

एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आपल्याजवळ असलेले खाद्यपदार्थाचे पाकिटे, तसेच पाण्याच्या बाटल्या, आणि आणखी काही गोष्टी ह्या तेथे रस्त्यावर न टाकता त्या कचरा कुंडीत टाकाव्या. आणि तेथे कचरा कुंडी दिसली नाही तर आपण तो कचरा आपल्या जवळ ठेऊन नंतर आपल्या सोबत घरी घेऊन यावे आणि घरच्या कचरा कुंडीत टाकावा.

घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा, आणि आपण शहरात राहायला असणार तर सकाळी येणाऱ्या नगरपालिकेच्या गाडीमध्ये त्याला टाकून द्यावे. आणि आपण खेड्यात राहायला असणार तर त्या कचऱ्याचे योग्य ठिकाणी व्यवस्थापन करावे.

कोणी तुमच्या समोर कचरा करत असणार तर त्याला कचरा करण्यापासून थांबवावे. आणि त्याला कचऱ्याला कचरा कुंडीत टाकायला सांगावे. होईल तेवढे कचरा न करण्याचा प्रयत्न करा कारण स्वच्छता ठेवण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करावी लागेल. म्हणतात ना आपण बदललो तरच देश बदलेल बस तसच काहीतरी.

तर अशा करतो आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि निबंधांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Makar Sankranti Essay in Marathi
Marathi Essay

मकर संक्रांति विषयी एक छोटासा निबंध

Makar Sankranti Essay in Marathi हिंदू धर्मातील एक विशेष सण म्हणजे पौष महिन्यामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत. तसेच इंग्रजी...

by Editorial team
January 14, 2021
Christmas Essay in Marathi
Marathi Essay

नाताळ किंवा क्रिसमस या सणाच महत्व सांगणारा छानसा निबंध

Christmas Essay in Marathi भारत हा असा देश आहे जिथे सर्व धर्मांचे लोक सलोख्याने राहतात, प्रत्येक धर्माचे सन वेगळ्या विशेषतेने...

by Editorial team
December 26, 2020
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved